Saturday, August 7, 2021

ऐ मेरे प्यारे वतन : राष्ट्रप्रेम की राष्ट्रद्रोह?

मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन, तुझ पे दिल कुर्बान' या गाण्यातील वतन भारत नाही, तर अफगाणिस्तान आहे. अफगाणिस्तानातून सुका मेवा आणून भारतात विकणाऱ्या गरीब व्यापाऱ्याच्या भूमिकेतील बलराज साहनी यांच्या तोंडी हे गीत आहे.

भारतात राहायचे, कमवायचे आणि गोडवे आपल्या देशाचे गायचे हा बहुधा आज राष्ट्रद्रोह मानला जाऊ शकतो. 

रवींद्रनाथ टागोरांच्या कथेवर आधारित १९६१ च्या काबुलीवाला सिनेमातील हे गाणे आहे. प्रेमधवन यांनी लिहिलेले, सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेले मन्नाडेंच्या आवाजातील हे गाणे मातृभूमीच्या आठवणीने कोणालाही व्याकुळ करणारेच आहे. 

ऐकणाऱ्याला आपापली मातृभूमी आठवते. तो देशच असेल असे नाही. आपले गाव असू शकते. ते वैराण असेल, पण माझे गाव असेल. माझी आई माझी असते. माझ्या वडिलांना आयुष्यभर मुंबईत नोकरी करुनही इथे काही करण्याऐवजी कोकणातले आपले घर बांधायचे व तिथेच शेवटचा श्वास घ्यायचा होता. त्यांच्या परमप्रिय मातृभूमीची व्याख्या कोकणातील छोटे गाव होते.

हे वतनाचे प्रेम (गाव, राज्य, देश, जग ...काहीही व्याप्ती असणारे) अन्य कोणाच्याही वतनाच्या प्रेमाआड येत नाही. त्याचा आदर, पुरस्कारच ते करते.

________

संकुचित राष्ट्रवादाच्या जोखडातून मुक्त होऊन आंतरराष्ट्रीय सहजीवनाचा महान संदेश देणाऱ्या रवींद्रनाथ टागोरांना त्यांच्या स्मृतिदिनी अभिवादन!

________


ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन, तुझ पे दिल कुर्बान

तू ही मेरी आरजू, तू ही मेरी आबरू, तू ही मेरी जान


तेरे दामन से जो आये उन हवाओं को सलाम

चूम लूँ मैं उस ज़ुबां को जिसपे आये तेरा नाम

सब से प्यारी सुबह तेरी, सब से रंगीं तेरी शाम


माँ का दिल बनके कभी सीने से लग जाता है तू

और कभी नन्ही सी बेटी बनके याद आता है तू 

जितना याद आता है मुझको उतना तड़पाता है तू 


छोड़कर तेरी ज़मीन को दूर आ पहुचे हैं हम

फिर भी है यही तमन्ना तेरे जर्रों की कसम

हम जहाँ पैदा हुये उस जगह ही निकले दम

......

No comments: